रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

डिग्री महत्वाची का ज्ञान महत्वाचे?


ही माझ्या एका मित्राची सत्यकथा आहे. शाळेमधे असताना त्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. त्याचे भाषा वीषय चांगले होते. त्याला मराठी, हिंदी या वीषयांच्या पेपरात चांगले मार्क्स पडायचे. आमच्या ग्रुपमधे बर्यातच जणांचा ओढा इंजिनीयरींगकडे होता. म्हणुन त्याने पण इंजिनीयरींगकडे जायचे ठरवले. त्याचे भाषा वीषय चांगईले आहेत म्हणुन त्याने आर्टसकडे जावे असे मी त्याला सुचवले तर त्याने मला वेड्यात काढले. पुर्वी इंजिनीअरींगच्या डिग्रीच्या ( बी.ई.) ऍडमीशन साठी कॉलेजची पी.डी.( प्री डिग्री ) व इंटर ( इंटर सायन्स ) अशी दोन वर्षे करावी लागत. ज्यांना इंटरला फर्स्ट क्लास मिळे त्यांनाच पुढे बी.ई. ला ऍडमीशन मिळे. माझा मित्र हा तसा गरीब मध्यमवर्गीय परिस्थितितुन आलेला. तरी सुध्धा त्याने हट्टाने कॉलेजमधे पी.डी. सायन्सला ऍडमीशन घेतली. इंटरला फर्स्ट क्लास मिळावा म्हणुन एक वर्ष ड्रॉप घेतला. इंटरला फर्स्ट क्लास मिळाला नाही म्हणुन इंजिनीयरींगच्या डिप्लोमाला ऍडमीशन घेतली. तीन वर्षांचा डिप्लोमा खस्ता खात पांच वर्षांत पुर्ण केला. म्हणजे मॅट्रीक झाल्यावर तो आठ वर्षे, म्हणजे पहिली ते आठवी, शीकत होता. इंजिनीयरींगमधील डिप्लोमा मिळाल्यावर तो एखाद्या कारखान्यात किंवा कंपनीत नोकरिला लागेल असा आमचा अंदाज होता. पण तो मित्राच्या ओळखिने स्टेट बँकेमधे कॅशीयर म्हणुन नोकरीस लागला. त्याला ती नोकरी आवडली. पुढे त्या नोकरीत प्रमोशन्स मिळावीत म्हणुन त्याने बी. ए. इकॉनॉमिक्स केले व स्टेट बँकेतुन उच्च पदावरुन निवृत्त झाला. इंजिनीयर होण्याच्या हव्यासापायी त्याने त्याच्या आयुष्याची आठ अमुल्य वर्षे वाया तर घालवलीच. पण इंजिनीयर झाल्यावर त्याने आपल्या या ज्ञानाचा काहीच उपयोग केला नाही त्याचे काय?
पुण्याच्या डिझेल इंजिने बनविणार्या एका कारखान्यात मी नोकरिला होतो. त्यावेळी राधाकृष्णन ( आम्ही त्याला राधा म्हणायचो ) नावाचा बी. ए. झालेला एक केरळी तरुण स्टेनो म्हणुन नोकरिला लागला. त्याला डिझेल इंजिनांमधे गोडी वाटु लागली. रोज तो आपली शिफ्ट संपल्यावर तासंतास वर्कशॉपमधे जाऊन बसत असे. तिथल्या माणसांना विचारुन विचारुन इंजिनाची व त्याला लागणार्याब महत्वाच्या पार्टसची माहिता घेत असे. त्यावर सुरेख नोट्स बनवत असे. इंजिनात काय काय बदल झाले आहेत व त्याची कारणे काय काय आहेत याचे त्याने सुरेख रेकॉर्ड ठेवले होते. अर्धात तो हे छंद म्हणुन करत होता. याचा त्याच्या नेहमिच्या कामाशी काही संबंध नव्हता. एकदा इंजिनामधे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला. तो सोडविण्यासाठी राधाच्या नोट्स उपयोगी पडल्या. कंपनिने त्याचो टॅलेन्ट ओळखले व त्याचे लंडनला ‘सर्व्हिस मॅनेजर’ म्हणुन पोस्टींग केले. त्याने पण बरीच वर्षे सर्व्हिस मॅनेजर म्हणुन उत्तम काम केले.
एक डिप्लोमा होल्डर इंजिनीयर स्टेट बँकेत कॅशीयर होतो. तर एक बी.ए.झालेला माणुस उत्तम इंजिनीयर होऊ शकतो हे कशाचे द्योतक आहे?
नुकतेच ऍपलच्या स्टिव्ह जॉब्जचे नीधन झाले. अमेरीकन तज्ञांच्या मते स्टिव्ह जॉब्ज हा थॉमस अल्वा एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळाखला जाईल. एडीसन हा फक्त चौथी पर्यंत शीकलेला होता. तर स्टिव्ह कॉलेजमधे फक्त एक सेमिस्टर एव्हडाच शीकलेला होता. त्यांच्याकडे इंजिनीअरींगची कोठलिही डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट वा क्वालिफिकेशन नव्हते. मग ते जगातले सर्वश्रेष्ठ इंजिनीयर्स कसे होऊ शकले?
शिक्षणाचा मुळ उद्देश ज्ञान देणे, कौशल्य वाढविणे, नवीन कौशल्य निर्माण करणे हा आहे. पण हल्ली शीक्षणाचा मुळ उद्देश डिग्रया व त्याची सर्टिफिकेटस देणे हा असावा असे वाटु लागले आहे. हल्ली शीक्षणातुन मीळणार्याय ज्ञानाकेक्षा त्यातुन मीळणार्यास डिग्रिला व डिग्रिच्या सर्टिफिकेटला नको येव्हडे महत्व प्राप्त झाले आहे. येन केन प्राकाराने एखादी डिग्री मीळवायची व त्या जोरावर एखादी चांगली नोकरी पटकावयाची असे अनेक लोकांचे प्लॅनींग असते. डिग्री हाच अनेकांच्या आयुष्याचा मुख्य पाया झाला आहे. मग डिग्री मीळविण्यासाठी अनेक परिक्षा द्याव्या लागतात. परिक्षेतील मार्कांवर ग्रेड ठरते. त्यावर पुढील भवितव्य ठरते. मग परिक्षेत पास होण्याचे, त्यात भरपुर मार्क्स मिळविण्याचे अनेक शॉर्ट कट्स उपलब्ध झाले आहेत. ते विद्यार्थांना ज्ञानार्थी बनविण्याऐनजी परिक्षार्थी बनवत आहेत. त्यामुळे ज्ञानापेक्षा डिग्रिला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास हे कधी कुठल्या शाळा कॉलेजमधे गेल्याचे किंवा त्यांच्या कडे कुठले डिग्री सर्टिफिकेट असल्याचे अजुनपर्यंत तरी आढळुन आलेले नाही. पण त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामिंचे दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ अजुनही लोकप्रीय आहेत. पिढ्यांन पिढ्या भक्तिभावाने त्यांचे वाचन व मनन चालु आहे. अजुनही हे ग्रंथ मरठितील ‘बेस्ट सेलर’ कॅटेगरितल्या पुस्तकात मोडतात.
लक्षमणराव किर्लोस्कर ड्रॉइंग टीचर होते. तर धिरुभाई अंबानी फक्त मॅट्रीकपर्यंत शीकलेले होते. त्यांच्याकडे इंजिनीअरींग किंवा मॅनेजमेन्ट मधले कोणत्याही तर्हेपचे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालि॑फिकेशन नव्हते. लक्षमणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर उद्योग समुहाची स्थापना केली. इंजिनीयरींगच्या क्षेत्रातील तो एक आघाडिचा उद्योग समुह म्हणुन ओळखला जातो. धिरुभाई अंबानिंनी रिलायन्स उद्योग समुहाची स्थापना केली. आज भारतातीतल खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठा उद्योग समुह म्हणुन रिलायन्स ओळखला जातो. अशी अनेक उदाहरणे आहेत.
कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा कसलेही क्वालिफिकेशन नसताना वरील लोकांना हे कसे जमले? कारण त्यांनी ज्ञानाचे महत्व ओळखले होते. डिग्री आणि ज्ञान यातला फरक ते जाणुन होते. पण नुसतेच ज्ञान मीळवायचे नाही. तर प्रत्यक्ष जीवनात त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता याईल या दृष्टिने पण ते सतत प्रायत्नशील राहिले.
ज्ञान मिळविण्याच्या मार्गात कधी शॉर्ट कटस नसतात. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग असतात. शाळा कॉलेजमधील शीक्षण हा एक मार्ग असतो. पण तो काही एकमेव मार्ग नव्हे. अर्थात ज्ञान मिळविण्याचा मार्ग खडतर तसेच वेळ घेणारा असतो. ज्या विषयाचे ज्ञान घ्यायचे त्याची मुळात आवड असावी लागते. अनेक लोकांना तांत्रीक वीषयात रुची असते. पण सगळ्यांनाच तंत्रशीक्षण घेणे जमतेच असे नव्हे. तंत्र शीक्षणाची कुठली पदवी किंवा सर्टिफिकेट आपल्याकडे नाही म्हणुन आपण काही करु शकणार नाही असे वाटुन ते आपल्यातील तांत्रीक वीषयातील रुची मारुन टाकत असतात. पण असे लोक सुध्धा उत्तम इंजिनीयर्स होऊ शकतात हे एडीसन किंवा स्टिव्ह जॉब्ज सारख्या लोकांनी दाखवुन दिले आहे.
याचा अर्थ लोकांनी डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट्स किंवा क्वलिफिकेशन्स मीळवु नयेत असा होत नाही. शीक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटला महत्व हे असतेच. पण त्याहिपेक्षा ज्ञानाला जास्त महत्व असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. डिग्री मिळाली, सर्टिफिकेट मिळाले म्हणजे आपले शीक्षण संपले असे समजु नये. तसेच शीक्षण घेताना त्यातुन मीळणार्या ज्ञानाला जास्त महत्व द्यावे, डिग्रिला नव्हे. कारण येणारा जमाना हा ज्ञानी लोकांचा आहे, क्वालिफाईड लोकांचा नाही हे लक्षात घ्यावे..

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२

विविध राज्यांतील गणेश

विविध राज्यांतील गणेश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी गणेशस्थाने आहेतत्यांपैकी काही परिचिततर अनेक अपरिचित आहेतत्यांपैकी काही स्थानांची थोडक्‍यात माहिती 

गोवा 
खांडोळ्याचा गणपती कामाक्षीदेवी कामरूपहून (आसामगोव्यात आलीत्याचप्रमाणे हा गणपतीही तिकडूनच आला अशी लोकांची श्रद्धा आहेतिसवाडी तालुक्‍यात दिवाडी गावाच्या नावेली येथे हा गणपती होता. 1560मध्ये या गणपतीची मूर्ती फोंडे तालुक्‍यातील खंडेपार येथे आणण्यात आलीनावेलीचे शेणवी नावेलकर हे गणेशभक्तगणेशाची मूर्ती हलविल्याने त्यांना खंडेपार येथे जाणे अवघड होऊ लागले.एका धनत्रयोदशीच्या रात्री नावेलकर मंडळींनी ही मूर्ती खंडेपार येथून पळविलीदिवाळीच्या पहाटे खंडेपारकरांना देवळात मूर्ती दिसेना म्हणून ते मूर्ती शोधण्यासाठी निघालेभाणस्तारच्या खाडीतून मूर्ती नेताना नावेलकरांना त्यांनी पकडलेदोघांत प्रचंड वादावादी झालीनंतर ठरले की दोघांनाही येण्याजाण्यासाठी सोयीच्या ठिकाणी मूर्ती ठेवावीत्यानुसार पणजी व फोंड्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या खांडोळे या गावी मूर्तीची स्थापना करण्यात आलीनरक चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती गावातून गेली म्हणून शेणवी खंडेपारकर अजूनही दिवाळी साजरी करत नाहीततर दिवाळीच्या दिवशी मूर्ती गावी आणता आली नाही म्हणून नावेलकरही दिवाळी साजरी करत नाहीतकार्तिक शुद्ध प्रतिपदेला समेट झाल्याने दोन्ही घराण्यांत दीपोत्सव साजरा करण्यात येतोया गणपतीचे मंदिर खांडोळ्याला डोंगराच्या पायथ्याशी नारळांच्या आगरात आहेपाषाणाची भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे
पुनळेकरांचा गणपती 
बार्देश महालात बस्तांदे येथे पुतळे वाडी आहेतेथे गणपतीचे देऊळ होतेते पोर्तुगिजांनी उद्‌ध्वस्त केलेत्यामुळे तेथील मूर्ती पेडणे महालातील धारगळ गावी नेण्यात आलीया गणपतीस पुनळेकरांचा गणपती म्हणतात
हरमलचा गणेश 
हरमल येथे इतिहासप्रसिद्ध नारायणाचे देऊळ आहेते आता पडक्‍या स्थितीत आहेया मंदिरात गणेशाची स्थापना केली आहेपोर्तुगिजांनी गणेशपूजनास बंदी घातल्याने भिंतीवरील चित्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झालीअजूनही काही सारस्वत कुटुंबे कागदावरील गणपतीचे पूजन भाद्रपदात करतात.

कर्नाटक कौण्डिण्य महागणपती 
कुरुडुमळे (जिकोलारया गावात हे गणपती मंदिर आहेकौण्डिण्य ऋषींचा आश्रय या ठिकाणी होतात्यामुळे याला "कौण्डिण्य क्षेत्रअसेही संबोधिले जातेत्रिपुरासुराशी लढायला जाण्यापूर्वी ब्रह्मा,विष्णू व महेश आणि इतर देवांनी या ठिकाणी महागणपतीची आराधना केली होतीम्हणून याला गणेशगिरी किंवा कुटाचल असेही संबोधले जातेयेथील महागणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशयात्रा पूर्ण होत नाहीअशी धारणा आहेमंदिराच्या मुख्य देवळाच्या गर्भगृहात महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची असूनहिरव्या संगमरवराची आहे.
इडगुंजी महागणपती इडगुंजी गावातील हा गणपती पंचखाद्यप्रिय महागणपती म्हणून ओळखला जातोहे गाव गोकर्ण क्षेत्रापासून 25 मैलांवर आहेएकदा नारद पार्वतीकडे गेले होतेतेथे गणपती गोड खाऊसाठी रडत होतात्या वेळी नारदांनी आश्‍वासन दिलेकी तुला रोज पंचखाद्य इत्यादी गोड खाऊ देववितोतू माझ्याबरोबर शरावती काठी इडाकुंज क्षेत्री चलपुढे तेथे विश्‍वकर्म्याने गणेशाची स्थापना केली,अशीकथा आहेही गणेशाची द्विहस्त मूर्ती आहेबालब्रह्मचारी रूपातील ही मूर्ती आहेविशेष म्हणजे या मूर्तीचे डोळे अतिशय बारीक असूनदोन्ही सुळे सारख्या आकाराचे आहेतइडलीसारखा पदार्थ मूर्तीच्या चारी बाजूंनी डोक्‍यापर्यंत अर्पण करण्याची पद्धत येथे आहेदुपारच्या आरतीच्या वेळी पंचखाद्य नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे.

गोकर्ण 
राक्षसाधीश रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचविणारा ब्राह्मण बटूच्या रूपातील गणेश म्हणून गोकर्णच्या गणेशाची ख्याती आहेही दोन हाती उभी सुमारे पाच फूट उंचीची पाषाणमूर्ती आहेही मूर्ती पाचव्या शतकातील असावीया मूर्तीला मुकुट नाहीरावणाने ठोसा मारल्याची खूण या मूर्तीच्या डोक्‍यावर दाखविली जातेहा गणपती गोकर्ण महाबळेश्‍वरच्या आवारातचपण स्वतंत्र मंदिरात आहे.
तमिळनाडू शंकराचार्यस्थापित गणेश श्रीरंगम स्थानकाच्या जवळच जंबुकेश्‍वराचे मंदिर आहेत्याच्या शेजारीच जगदंबेचे मंदिर आहेया मंदिराच्या समोरच गणेशमंदिर आहेही मूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केली आहेजगदंबेची मूर्ती पूर्वी तेजस्वी आणि उग्र होतीतिचे उग्र तेज शांत करण्यासाठी शंकराचार्यांनी गणेशाची स्थापना तिच्यासमोरच केली अशी कथा सांगितली जाते.
उत्तर प्रदेश धुंडीराज (श्रीक्षेत्र काशीकाशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिराच्या परिसरात ही गणेशमूर्ती आहेभारतातील 21 गणेशस्थानांपैकी हे एक स्थान आहेभस्मासुराचा मुलगा दुरासद याचा नाश करण्यासाठी देवांच्या प्रार्थनेवरून दिव्य अवतार धारण करून त्याचा नाश केलाअशी कथा आहेकाशी क्षेत्रात 56 विनायक असल्याची नोंद आहे.
sakal.com

सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

'रिझ्यूम' तयार करताना...

नोकरी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' असतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तम जॉब मिळवणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे 'मिशन' असते तर नोकरी मिळाली पण त्यात 'सॅटीसफॅक्शन' नाही, असे चांगल्या 'ब्रेक'च्या प्रतिक्षेत असतात. त्यासाठी तुमचा 'सीव्ही' अर्थात 'रिझ्युम' देखील तितकाच ताकदीचा हवा. आकर्षक हवा. तुमचा 'सीव्ही' पाहताच तुम्हाला 'ऑफर लेटर' मिळावे असा छाप पाडणारा असायला पाहिजे. त्यासाठीच या काही टिप्स...

तुमच्यात असलेली कौशल्ये व त्या- त्या जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यांची सांगड तुमच्या सीव्हीमध्ये व्यवस्थीत घातलेली असवी. काही ठिकाणी तुमच्याकडे असलेला अनुभव पुरेसा नसतो तर अशावेळी तुम्ही त्या-त्या पोस्टसाठी कसे 'फिट' आहे, हे 'रिझ्युम'मध्ये 'प्रेझेण्ट' करता आले पाहिजे. 

तुमचा 'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी काही टिप्स :

* तुमचा 'रिझ्यूम' हा मुलाखत घेणार्‍याला तुमची ओळख करून देत असतो. त्यामुळे तुमचे शिक्षण, वैयक्तीक माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण ह्यांची मुलाखत घेणार्‍यास कल्पना आली पाहिजे. 

* तुम्ही केलेले शिक्षण, कोसेर्सची माहिती, ज्या संस्थेतून केले त्याचे नाव अशा सर्व गोष्टी त्यात असाव्यात. तुमचं 'लेटेस्ट क्वालिफिकेशन' सर्वात वर असायला हवं.

* 'रिझ्यूम' हा तुम्ही तयार केला असल्याने त्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक असते. मुलाखत घेणार्‍याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 'रिझ्यूम'मधील एखादा मुद्दा समजावून सांगताना गोंधळ होता कामा नये. त्यामुळे 'रिझ्यूम' स्वत:च्या शब्दांत आणि सोप्या भाषेतच लिहिला पाहिजे. 

* तुम्ही शिक्षणात तसेच आधीच्या नोकरीत विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याला तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये चांगले स्थान दिले पाहिजे. त्याची थोडक्यात पण संमर्पक माहिती दिली पाहिचे. 

* तुमच्या आवडी-निवडी, छंद या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यांनाही तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये स्थान मिळाले पाहिजे. 

* 'रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळावे. 

नोकरी म‍िळावी, तिच्यावरच आयुष्य खपवावं आणि वयाच्या 58 व्या वर्षी 'रिटायर्ड' व्हावं. हा आपल्या वडिलांचा काळ केव्हाच मागे पडला आहे. आजचे युग हे फास्ट झाले आहे. त्यामुळे दोन- तीन वर्षात नोकरी 'चेंज' करणे आजच्या यंगस्टर्सचे तर वैशिष्ट्य झाले आहे.


सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

नोकरीसाठी जाताना....

तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो.

तुम्ही जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही केवळ तुमच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे मागे पडलात. मग दु:ख करण्‍यात तुम्ही तुमचे पुढचे आयुष्यही बरबाद करता. त्यापेक्षा नोकरीवर जाण्यापूर्वीच काही गोष्टींची माहिती तुम्हाला होणे गरजेचे आहे. 

संपूर्ण माहिती घ्या: 
ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल त्या कंपनीची माहिती आधी जमा करा. त्या कंपनीचा अभ्यास करा. त्या कंपनीचा इतिहास, तिची होणारी वाढ आणि हो नुकसानही कंपनीच्या वरिष्ठांना सांगाल म्हणजे तुम्ही कंपनीचा केलेला अभ्यास त्यांना जाणवेल. तुमच्या आवाजात कोणताही आक्रमकपणा जाणवू देऊ नका. वायफळ बडबड टाळा. एका वाक्यात मुळीच उत्तरे देऊ नका. 

अधिकार्‍याने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करा. उगाच खोटे उत्तर द्याल तर अडकाल. 
कंपनीच्या कोणत्याही अधिकार्‍याला ओळखत असाल तरी त्याचे नाव सारखे सारखे इंटव्ह्यूमध्ये सांगू नका. अशाने अधिकार्‍यांचे तुमच्याबद्दलचे मत खराब होईल. 

काही टेबल प्रोटोकॉल पाळा. तुमच्यासाठी चहा आणला असेल तरी तुम्ही अधिकार्‍यांनी तो चहा घेण्यापूर्वी पिण्याची घाई करु नका. कंपनीच्या आगामी दिशेविषयीच्या तुमच्या काही कल्पना असतील तर त्या अधिकार्‍यांना नुसत्या सांगूच नका तर त्यांना त्या पटवून देण्याचा प्रयत्न करा. 

या बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्या: 
1. तुमचे पाय सरळ ठेवा. तुम्ही पाय जर विळखा घातल्यासारखे ठेवले तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे. 

2. इंटरव्ह्यू घेणार्‍या अधिकार्‍याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुम्ही जर असे केले तर तुमचा आ‍त्मविश्वास त्यातून दिसून येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी खर्‍या आहेत हे पटेल. 

3. तुमच्या खाद्यांना जरासेच पुढच्या बाजुने झुकवत समोरच्या वक्तीशी संवाद साधा. याचा अर्थ असा होतो की तुमचे मन साफ आहे. हो पण जास्त पुढे झुकु नका. त्याने तुम्ही समोरच्याची खुशमस्करी करत असल्याचे दिसून येते. 

4. समोरची व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला काही सुचना करत असतील तर त्यांचे वाक्य पुन्हा बोलू नका. तो त्यांचा अपमान समजला जातो. तुम्ही केवळ मानेने होकार देऊ शकता. 

चेहर्‍यावर तेज दिसण्यासाठी त्या दिवशी मनात सकारात्मक विचार करा. 

उनाडपणा करणे टाळा. 

या काही महत्वाच्या टिप्स पाळाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

रविवार, २९ जुलै, २०१२

जेईई-आयआयटीसाठी अशी तयारी करा!

आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.

दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.

साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात.... 

बारावीनंतर ड्रॉप घेऊन
अकरावीदरम्यान 
बारावीत असतान

आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते. 

विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....

आत्मविश्वा
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.

तयार
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.

नेमके मार्गदर्श
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.

लक्ष केंद्रीत कर
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

अभ्यासाचे वेळापत्रक बनव
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.

आपले कच्चे दुवे ओळख
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.

गुणवत्तेकडे लक्ष द्या 
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.

स्वतःचीच परीक्षा घ्य
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.

या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा.

सोमवार, १६ जुलै, २०१२

कमी शिक्षणातही सरकारी नोकरी

आनंद मापुस्कर 
सरकारी नोकरी म्हणजे ग्रॅज्युएशन हवंच असा अनेकांचा समज असतो पण दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. याच स्पर्धा परीक्षा आणि विविध संधींची माहिती 

स्टाफ सिलेक्शन कमिशन 

कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन २०१२ 

डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्क भरती) 

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध ऑफीसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते . या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. या भरती परीक्षेतून उमेदवार २ गटात (एक्स व वाय)मध्ये नोकरीसाठी पसंती देऊ शकतात . 

ग्रुप एक्स : 

यात निवडलेले उमेदवार खालील ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून काम करू शकतात . 
आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स 
निवडणूक आयोग 
इंटेलिजन्स ब्युरो 
कोस्ट गार्ड 
इंडियन फॉरेन सर्व्हिस 
सीबीआय 
राष्ट्रपती सचिवालय 
संसदीय कामकाज मंत्रालय 
केंद्रीय दक्षता आयोग 

ग्रुप वाय : 

यातले उमेदवार खालील ऑफिसमध्ये डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकतात. 
कॅग 
लेखा परीक्षक 
संरक्षण दले लेखा विभाग 
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण 
वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे. 
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत : १० ऑगस्ट २०१२ 
परीक्षा फी : १०० रुपये ( महिला तसेच एससी एसटी व अपंग उमेदवारांना फी नाही ) 
परीक्षा दिनांकः २१ व २८ ऑक्टोबर २०१२ 
विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन भरू शकतात विद्यार्थ्यांनी केवळ एकच अर्ज भरावा. त्यापेक्षा जास्त अर्ज भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही. महाराष्ट्राचं विभागीय केंद्र मुंबईला असून परीक्षा केंद्र औरंगाबाद मुंबई कोल्हापूर नागपूर पुणे नाशिक अमरावतीला आहेत. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (पश्चिम विभाग) 

हेल्प लाईन नं ९८६९७३०७०० ७७३८४२२७०५. 

निवड प्रक्रिया - 

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा स्कील टेस्ट (डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी) टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते 

लेखी परीक्षा - 

लेखी परीक्षा २०० गुणांची असून पेपरचं स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. २ तासांचा वेळ असतो. पेपर इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाल्यास तसेच प्रिंटींग व तज्ञांची उपलब्धता झाल्यास या परीक्षेचे पेपर्स मराठी वा इतर भाषेतून तयार केले जातील असं कमिशनच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. लेखी परीक्षेत चार विषयावर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात. 

विषय 

सामान्य बुध्दीमापन 
इंग्रजी भाषा 
क्वांटीटिटीव्ह अॅप्टिटयुड ( अंकगणितीय क्षमता) 

सामान्य ज्ञान 

स्कील टेस्ट- 

डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावलं जाते. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटं इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितलं जातं. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन असायला हवा. त्यात केवळ पास होणं आवश्यक आहे. त्याला वेगळे गुण नसतात. 

टायपिंग टेस्ट - 

लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावले जाते. ही टेस्ट हिंदी किंवा इंग्लीशची असते. इंग्लीश टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदीचा वेग ३० शब्द प्रती मिनिट असावा लागतो. टायपिंगची परीक्षा कम्प्युटरवर घेतली जाते त्यात १० मिनीटात दिलेला उतारा टाइप करायचा असतो. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

क्लार्क-टायपिस्ट ( इंग्रजी मराठी) 
मंत्रालयीन विभाग व मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील क्लार्क आणि मराठी व इंग्रजी टायपिस्ट या गट क संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात येते. 

वयोमर्यादा - 

किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे. 

शैक्षणिक पात्रता - 

दहावी पास 
क्लार्क-टायपिस्ट (मराठी) साठी मराठी टायपिंग वेग ३० शब्द प्रति मिनिट 
तर क्लार्क-टायपिस्ट (इंग्रजी)साठी इंग्रजी टायपिंग वेग ४० शब्द प्रति मिनिट हवा. 
उमेदवाराला मराठी बोलता वाचता व लिहीता येणं गरजेच आहे. 

परीक्षा टप्पे -फक्त लेखी परीक्षा घेतली जाईल. 

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून ४०० गुणांसाठी २०० प्रश्न असतील. वेळ दोन तास असेल. इंग्रजी विषयाकरिता इंग्रजी माध्यम तर अन्य सर्व विषयांसाठी मराठी माध्यम असेल. 

अभ्यासक्रम 

मराठी - व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर. 
इंग्रजी - स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर. 
सामान्यज्ञान - दैनंदिन घटना नेहमीचे अनुभव धर्म साहित्य राजकारण शास्त्र सामाजिक व औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. 
बुध्दिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. 
अंकगणित - बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक सरासरी व टक्केवारी. 
क्लार्क व टायपिस्ट पदांसाठीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. यासाठी महाराष्ट्रातील शासकीय परीक्षा मंडळाची टायपिंग परीक्षा पास असणं आवश्यक असतं. नुसतंच टायपिंग येऊन उपयोग नाही.
सौजन्य -महाराष्ट्र टाईम्स 

बुधवार, ११ जुलै, २०१२

न्यूयॉर्कमध्ये शिका 'एक्टिंग'


करियर

बहुतांश तरूण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक क्षेत्रात करियर करण्याचे ठरवितात.काहीनी तर स्वत:भोवती एक ठराविक चौकटच आखून घेतलेली असते. ती चौकट ओलांडायची नाही, असा त्याचा पालकांचा आग्रह असतो. मग विद्यार्थी ही चौकट पार करणार तरी कसे? अशा गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. आताचा काळ बदलला आहे आणि पालकही. तरूणांसह त्यांचे पालकही आता बिंधास्त झाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य द‍िले असल्याने काही होतकरू तरूण शिक्षण घेत असतानाच करियरची दिशा ठरवित असताना दिसतात.

न्यूयॉर्क फिल्म अकादमी अर्थात 'स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅण्ड एक्टिंग' ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्था मानली जाते. येथे फिल्म मेकिंग, प्रोड्यूसिंग, स्क्रीप्ट राइटिंग, डिजिटल फिल्म मेकिंग, कॉम्प्यूटर एनिमेशन व एक्टिंगचे उत्कृष्ट व एक्सलन्स कोर्सस ‍शिकविले जातात. विशेष म्हणजे न्यू ब्रॉन्ड रेड हाईडिफिनिशन व्हिडिओ कॅमरा येथील विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासाठी हाताळण्यासाठी उपलब्ध करून देणारी ही एकमेव संस्था आहे. प्रत‍िवर्षी येथे जगातील सहा हजार विद्यार्थी एक्टिंग, डिरेक्शन इंटरटेनमेंटचे प्रशिक्षण घेत असतात.

ओवन क्लिने, मॅक्स स्पीलबर्ग, बेविन प्रिंस, रोज (लोनली गर्ल 15), पॉल डॅनो, इमरान खान सारखा हॉलिवूड व बॉलिवूडमधील स्टार न्यूयॉर्क अकादमीचे स्टूडेंट राहिले आहेत. एवढेच नव्हेतर 2008 चा मिस यूनिव्हर्स हा पुरस्कार प्राप्त करणारी डायना मेंडोजा ही देखील याच अकादमीची विद्यार्थिनी होती. 

लर्निंग बाय डूइंग मेथड: 
न्यूयॉर्क अकादमीमधील प्रशिक्षण प्रामुख्याने 'लर्निंग बाय डूइंग मेथड'वर आधारित असते. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित विशेषज्ज्ञ व सिनेअभ‍िनेत्यांसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असते. विद्यार्थ्यांची अभिरूची लक्षात घेऊन त्यांना तशी नोकरीही उपलब्ध करून दिल्या जाते. 'करा आणि शिका' या गुरूमंत्राच्या आधारे विद्यार्थींना येथे पहिल्या दिवसापासून फिल्म राइटिंग, शूटिंग, डिरेक्शन, प्रोडक्शन एडिटिंग आदी कामे करण्याची संधी म‍िळत असते. थेअरी पेक्षा येथे प्रात्याक्षिकावरच अधिक भर फिल्म स्कूलमध्ये दिला जात असतो. 

अकादमीचे विविध कोर्सेस:
फिल्म मेकिंग व एक्टिंग संबंधित येथे शार्ट टर्म कोर्सेसशिवाय एक व दोन वर्षाची कन्जर्वेंटरी व मास्टर ऑफ फाईन आर्टस् चे कोर्सेस शिकविले जातात. ते पुढील प्रमाणे...

डिग्री प्रोग्राम:
* एक व दोन वर्षीय कन्जर्वेटरी प्रोग्राम:
एक्टिंग, फिल्म मेकिंग, ब्रॉडकॉस्ट जर्नलिझम, थ्री डी एनिमेशन, म्यूझिकल थियेटर, प्रोड्यूसिंग फॉर फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही, स्क्रीप्ट राइटिंग, डॉक्यूमेंट्री फिल्ममेकिंग, सिनेमॅटोग्राफी. 
* मास्टर इन फाईन आर्टस्:
फिल्म मेकिंग, स्क्रीन राइटिं, एक्टिंग.
* दोन वर्षीय असोसिएट्‍स इन फाईन आर्टस्:
फिल्म मेकिंग, एक्टिंग.

शॉर्ट टर्म प्रोग्राम्स:
* शॉर्ट टर्म हॅन्डस् ऑन इन्टेंसिव्ह वर्कशॉप अ‍ॅण्ड इव्हेनिंग क्लासेस.
* हायस्कूल अ‍ॅण्ड प्री टीन वर्कशॉप अ‍ॅण्ड समर कॅम्प. 

प्रतिष्ठित संस्थाद्वार पदवी मिळते:
दी न्यू स्कूल न्यूयॉर्क, सेंट जॉन्स यूनिव्हर्सिटी, फेअर‍लिन, डि‍किन्सन यूनिव्हर्सिटी न्यूजर्सी, चार्टर ओक स्टेट कॉलेज कनेक्टिकट, नोवा साऊथ ईस्टर्न यून‍िव्हर्सिटी फ्लोरिडा, लिन यूनिव्हर्सिटी फ्लोरिडा, अंटिऑक यूनिव्हर्सिटी लांस एंजिल्स आदी संस्थाद्वारा विद्यार्थ्यांना एनवायएफएच्या कोर्सेची पदवी ही प्रदान केली जात असते. 

विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्‍यासाठी टिक्स स्कूल ऑफ द आर्टस्, कोलंबिया यूनिव्हर्सिटी, अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूट कन्जर्वेटरी, यूनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निंया, स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी, हावर्ड यूनिव्हर्सिटी, येल यूनिव्हर्सिटी व यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लांस एंजिल्स येथील विशेषज्ज्ञांना आमंत्रित केले जाते.

जानेवारी, मार्च, जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सत्र सुरू केले जातात. न्यूयार्क फिल्म अकादमीत प्रवेश मिळविल्यानंतर मागासवर्गिय भागातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते.

'एकिंग' शिकविणार्‍या अमेरिकेतील विविध संस्था:
* यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निंया.
* यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लांस एंजिल्स.
* अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूट कन्जर्वेटरी.
* कॅलिफोर्निंया इंस्टिट्यूट ऑफ दी आर्टस्.
* कोलंबिया यूनिव्हर्सिटी.
* स्कूल ऑफ दी आर्टस् ऑफ शिकागो.
* फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटी.
* नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटी


http://www.mumbaimantra.com/
http://www.imapictures.com/index.php